अभ्यासवर्गाचे पासेस मिळवण्यासाठी.

रवी पवार :-  7709542573
स्वप्नील कोलते पाटील :-  7774041896
दामोदर मगदूम :-  9421051889

________________________________

________________________________

Online पैसे भरण्यासाठी,

Harit Bhumi Foundation

Account Number: 051610110006131

IFSC Code: BKID0000516

Bank of India, Pashan Road, Pune.

पैसे भरल्याचा मेल shivsahyadrigatha@gmail.com ह्या मेल आयडीवर करणे,
आपले पास राखून ठेवण्यात येतील.
नमस्कार मंडळी!
एबीपी माझा करतोय मराठीतली एकमेव आणि अभिनव अशी ब्लॉग माझा स्पर्धा. आपण गेल्या वेळी ज्याप्रकारे या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला होतात, तसाच प्रतिसाद यावेळीही अपेक्षित आहे. त्यासाठीच हा ईमेलप्रपंच.
मराठी ब्लॉगिंगचं क्षितीजही आता विस्तारतंय. विविध विषयांना धीटपणे भिडताना मराठी ब्लॉगर्स दिसत आहेत. फक्त स्फूट लेखनंच नाही तर, कविता, फोटो, कथा असेही प्रकार हाताळले जात आहेत. फक्त ललितच नव्हेतर विज्ञान, शेती, परराष्ट्र संबंध, कला, साहित्य अशा विशेष विषयांनाही मराठी ब्लॉग्ज आपल्या कवेत घेत आहेत. अशाच मराठी ब्लॉग्ज आणि ब्लॉगर्सचं कौतुक करतोय एबीपी माझा’ ‘ब्लॉग माझाया मराठीतल्या एकमेव ब्लॉगिंग स्पर्धेच्या रूपानं.
 तेव्हा मंडळी तुमच्यात दडलेल्या लेखक / लेखिकेला केवळ डायरी, फेसबुक किंवा ट्विटर पुरताच मर्यादित ठेवूनका. या स्पर्धेत भाग घ्या. ब्लॉगवर नियमित लिहित असाल तर ठिकच, नाही तर ब्लॉग अपडेट करा. ब्लॉग नसेल तर या स्पर्धेच्या निमित्तानं सुरू करा.
 काय म्हणालात? बक्षिसांचंकाय? अहो, बक्षीसंआहेतंच की! पहिल्या तीन जणांना विशेष पारितोषकं आणि उर्वरीत दहा जणांचा उत्तेजनार्थ गौरव. आता कोणती बक्षीसं आहेत ते गुपित राहूद्या की! शिवाय, तुमच्या निवडलेल्या ब्लॉगला एबीपी माझाच्या वेबसाईटवर प्रसिद्धी आणि बक्षीस वितरण समारंभ थेट एबीपी माझावर!

.....तेव्हा मित्र-मैत्रिणींनो येऊ द्या तुमच्यातल्या लेखक-लेखिकेला जगासमोर!

स्पर्धेचं स्वरूप-
 १. ब्लॉग युनिकोड मराठीतच लिहिलेला हवा (देवनागरी)
 २. अठरा वर्षांपुढील कुणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं.
 ३. सर्वोत्तम ब्लॉग निवडण्याचे अधिकार पूर्णत: परिक्षक आणि स्पर्धा संयोजकांकडे
असतील. त्याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण देण्यास परिक्षक, संयोजक, ‘एबीपी माझा हे
बांधील नसतील. तुमचे प्रवेश हे तुम्हाला अटी मान्य असल्याच्या निदर्शक असतील.
 ४. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी blogmajha@gmail.com या ई-मेल अँड्रेसवर ई-मेल करावा.  ज्यात, तुमचं नाव, तुमच्या ब्लॉगचीलिंक, पत्ता, व्यवसाय, दूरध्वनी क्र, मोबाईल क्र, व ई- मेल द्यावा. ई-मेल अँड्रेस देणं अनिवार्य आहे.
 ५. या स्पर्धेसाठी कोणतंही शुल्क नाही.
 ६. एकावेळी एका स्पर्धकाला फक्त एकच ब्लॉग पाठवता येईल.
 ७. ब्लॉग पाठवण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2015.
 ८. स्पर्धेचा निकाल एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होईल. तसंच, संबंधित
विजेत्यांनाच फक्त ई-मेलद्वारे निकाल कळवला जाईल.
 ९. यानंतर एबीपी माझाच्या खास एपिसोडमध्ये विजेत्यांचा सत्कार करण्यात येईल व पुरस्कार वितरण होईल.
 १०. स्पर्धेचं आयोजन, नियमावली, अटी, बक्षीसंयासंदर्भात कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय
बदल करण्याचे अधिकार एबीपी माझाकडे असतील.
 ११.ब्लॉगमधला कंटेंट स्वत:चाच असावा. जर अन्य स्त्रोतांकडून माहिती घेतली असेल, तर त्यांचा नाममिर्देश करावा. ब्लॉग व त्यातील मजकूर आपलाच असल्याचेसिद्ध करणे, ही स्पर्धकाची जबाबदारी आहे. तुमच्या ब्लॉगद्वारेबौद्धिक संपदा अधिकार, कॉपीराईट कायदा यांचा भंग झाल्यास, उचलेगिरी आढळल्यास त्या ब्लॉगरचा स्पर्धेतला सहभाग व पारितोषिक मिळाल्यास तेही रद्द करण्यात येईल.

धन्यवाद,
एबीपी माझा टीम




का, कशासाठी अशा तर्कसुसंगत उत्तरांची अपेक्षा करणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कायम देता येतातच असं नाही. आपण रोज जे जगतो, त्यामध्ये आपण अनेक वेळा या प्रश्नांच्या उत्तरादाखलच अनेक गोष्टी करत असतो. नोकरी का? पैसे लागतात म्हणून. लग्न कशासाठी? करावं लागतं म्हणून. सिनेमा का? मनोरंजन व्हावं म्हणून. झोप कशासाठी? आराम मिळावा म्हणून. आपण करतो, त्या प्रत्येक गोष्टीसाठी तात्कालिक घटना किंवा युगानुयुगं घडत गेलेल्या गोष्टींमुळे पडत गेलेले पायंडे यांसारखी काहीतरी कारणं असतातच. विनाकारण कोणतीही गोष्ट करणाऱ्या माणसाला आपण सहसा वेडा म्हणतो. गोबीचं वाळवंट पायी पार करण्याच्या मोहीमेमध्ये भाग घ्यायचा ठरवल्यानंतर मलाही असच अनुभव आला. का, कशासाठी अशा प्रश्नांचं कोणतंही समाधानकारक उत्तर याविषयी माझ्याकडे नव्हतं. अर्थात मोहीमेतला सहभाग निश्चित झाल्यानंतर ही मोहीम मला का करायची आहे, याची वैयक्तिक कारणं माझ्याकडे होती. पण ती कारणंसुद्धा तर्कसुसंगत वाटावीत अशी आजिबात नव्हती. मोहीमेकडून मला जे अनुभव येणं अपेक्षित होतं, ते तर आलेच. स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांची मर्यादा आजमावून बघता आली. वाळवंट ही काय चीज आहे, हे पक्क उमगलं. परंतु याही पलिकडे जाऊन, काही फार निराळे, एका शब्दात, एका वाक्यात सांगता न येणारे, असे काही अनुभव मला आले. ते अनुभव नेमके काय होते, याचा शोध मी अजूनही घेते आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------
आंखे मूंद किनारे बैठो, मन के रख्खो बंद किवाड,
इंशाजी लो धागा लो, लब सिलो खामोश रहो
अशा शांततेचा अनुभव आपण किती वेळा घेतो? रोजच्या जगण्यामध्ये तर नक्कीच नाही. अगदी ठरवून मुद्दाम शांत-रम्य ठिकाणी गेल्यावर आपण अनुभवतो, ती देखिल खरं म्हणजे शांतता नसतेच. शांत-रम्य ठिकाणी जवळच्या व्यक्तीला बरोबर घेऊन गेल्यावर शांततेत तरंग उठल्याशिवाय रहातील कसे? अगदी आपण एकटे गेलो, तरी आपल्या आत चाललेली अनगोंदी, गडबड, आणि उसळलेला विचारांचा डोंब आपल्याला शांततेचा सविस्तर अनुभव घेऊच देत नाही. वर सांगितलेल्या दोह्यामध्ये लिहील्याप्रमाणे मन के रखो बंद किवाड, हे अशक्यप्राय वाटतं... किंवा लब सिलो खामोश रहो,” ही शक्यता तर फारच दूरची. विचार करताना वाटतं, 21 व्या शतकात जाण्याची घाई असणाऱ्या कोणत्याही देशात, शहरात, खेड्यात अशी शांतता अनुभवायला मिळणं शक्यच नाही. मी मात्र गोबीच्या वाळवंटात शांतता तिच्या अगदी नैसर्गिक स्वरुपात अनुभवली. मंगोलियामधलं गोबीचं वाळवंट आणि त्या वाळवंटामध्ये रहाणारे हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके भटके लोक. उत्कांतीच्या काही अवस्था मागेच असलेले. आवाज निर्माण करणारी कोणतीच यंत्र त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे कोणताच कृत्रिम आवाज त्यांच्या ओळखीचा नाही. अथांग वाळवंटाच्या मध्यात दिसणारं या लोकांचं एखादंच घर. त्या घरामध्ये रहात असणारं, एकच कुटंब- 7-8 लोकांचं. हे लोक आणि त्यांच्या शेळ्या, मेंढ्या, घोडे, आणि उंट... असा त्यांचा तांडा. शेजार कमीत कमी 300 किलोमीटर लांब. अशा स्थितीत आवाज होणार तरी कशाचा आणि किती? एकमेकांशी बोललं तरी सुद्धा त्या आवाजाचा, त्या वाळूच्या पसाऱ्यामध्ये इवलासा तरंग उठणार आणि विरून जाणार...
वाळवंटातली सुंदर थंड रात्र, वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अधिकच जाणवणारी थंडी, स्वच्छ निळं आकाश, त्या निरभ्रतेमध्ये अगदी जवळ दिसणारा मोठ्ठा चंद्र, चंद्राच्या प्रकाशामध्ये उठून दिसणारे आमचे हिरवे तंबू... अगदी चंद्रमौळी झोपड्यांची आठवण करून देणारे...आवाज म्हणावा असं काहीच नाही. एका सरळ रेषेत बांधून ठेवलेल्या आमच्या उंटांपैकी कोणी शिंकलाच, तर त्याच्या शिंकेच्या आवाजसुद्धा गडगडाटासारखा भासणार. रात्री तंबूमध्ये जमीनीला कान लावून स्लिपिंग बॅगमध्ये झोपल्यावर तंबूच्या बाहेर वाळूवरून चालणाऱ्या एखाद्या सापाची किंवा विंचवाची सळसळ सुद्धा थ्री.डी. सिनेमासारखी अंगावर येणार... शांततेची सुद्धा भीती वाटावी अशी ही परिस्थिती!
मोहीमेला सुरुवात झाली, त्यावेळी 9 वेगवेगळ्या देशांमधून आलेले आम्ही 13 जण होतो. नवीन लोकं, नवीन ओळखी होत होत्या. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये भरपूर गप्पा होत. दिवसभर चालताना, संध्याकाळी कॅम्प केल्यावर, ते अगदी रात्री झोपेपर्यंत गप्पा रंगत. हळूहळू मोहीमेची तीव्रता वाढत गेली. उन्हाचा तडाखा वाढत गेला. प्रत्येकाने आपापला ताल पकडून चालायला सुरूवात केली. प्रत्येकाचा वेग वेगळा, काना-मनात वाजत असलेलं गाणं वेगळं, त्याच्या तालाशी पावलांचा मेळ घालत पकडलेली लय वेगळी. आपसांत बोलणं हळू हळू कमी होऊ लागलं. 8 तासांच्या चालण्यामध्ये मुश्किलीने 4-5 वाक्य बोलली जात. कॅम्प केल्यावर देखिल रात्रीचं जेवण होपर्यंत सगळे जण तंबूच्या बाहेर येऊन बसत. पण गप्पा नाहीच. पत्येकाकडे आपापलं साधन... स्वतःशीच संवाद साधण्यासाठी. कोणाकडे लिहायला डायरी, कोणाकडे वाचायला पुस्तक, कोणाकडे ऐकायला संगीत, कोणाची नुसतीच शून्यामध्ये लागलेली तंद्री, कोणी उंटांबरोबर न बोलता रमलेला, तर कोणी स्वयंपाकघराच्या तंबूमध्ये आमची केवळ कझाक भाषा येणारी कुक- यंका – तिच्याबरोबर स्वयंपाकात रमलेला. विचित्र गोष्ट अशी, की एकमेकांशी बोलायची गरजही वाटायची नाही. माणूस हा समाजप्रिय प्राणी, त्याला माणसांची गरज असते वगैरे वगैरे म्हणतात. मग त्या इतक्या खडतर परिस्थितीमध्ये, शरिराला प्रचंड थकवल्यावर सुद्धा आम्हाला एकमेकांशी बोलायची गरज का बरं वाटत नव्हती? कदाचित आम्ही सगळे एक टीम म्हणून एकत्र होतो, तरीही सगळे जण एक-एकटेच होते. शरिराला सर्वाधिक वेदना होत असताना माणसाला, माणसाच्या संगतीची ओढ का वाटत नाही?  हा अनुभव खूप विचित्र आणि धक्कादायक होता. वैयक्तिक माझ्याबद्दल सांगायचं, तर मला एकटीलाच राहायला आवडू लागलं होतं. दिवसभर ट्रेकिंग करताना सगळे एकत्र असत, एकत्र चालत. चालताना, एकमेकांमध्ये कधी कधी 1-2 किलोमीटरचं सुद्धा अंतर असे. कोणी दोघं जण अगदी एकत्र म्हणावे, असे शेजारी शेजारी चालत असले, तरी त्यांच्यामध्ये संवाद कधीतरीच व्हायचा. आता विचार करताना वाटतं, कितीतरी दिवस मी एकही शब्द बोलले नसेन. विपश्यनेचा भाग म्हणून लोकांना असं मौनव्रत पाळावं लागतं, हे ऐकलं होतं. पण मौनाचा हा अनुभव मी माझ्या नकळत घेत होते. स्वतःशीच होणारा संवाद वाढत होता.
वयाच्या 32 वर्षीपर्यंत कित्येक अनुभव मी घेतले असतील. पण आता वाटतं, त्या कोणत्याच अनुभवाची खऱ्या अर्थानं अनुभूती मला झाली नव्हती. खरं म्हणजे, जोवर तुम्ही असे एकटेच संपूर्णपणे  निसर्गाच्या अधीन जात नाही, तोवर एखादा अनुभव घेणं म्हणजे नेमकं काय असतं, हेच आपल्याला कळत नाही. सुख-दुःखाचे अनेक प्रसंग पत्येकावर गुदरतात. पण रोजचं जगताना लहानपणापासून आपण कायम स्वतःला तडजोडच करायला शिकवत असतो. दुःख झालं तर ते झटकून मनाची उभारी घेऊन पुढे जायला आपल्याला शिकवलं जातं. जवळच्या व्यक्तीचंर निधन असो, परीक्षेत आलेलं अपयश असो, प्रेमभंग असो किंवा अजून काही. जो माणूस या सर्व  दुःखाच्या प्रसंगांवर मात करून उभा राहातो, तो आपल्या ठायी यशस्वी, असं आपण म्हणतो. याच उलट आनंदाच्या प्रसंगातही आपली विवेकबुद्धी आणि समतोल ढळू न देणारा मनुष्य आपल्या लेखी मोठा ठरतो. हे सगळं करताना असं वाटतं, की आपण हे सुख-दुःखाचे कोणतेही प्रसंग मुळात अगदी संपूर्ण असे अनुभवतच नाही. त्या प्रसंगांमधून आपल्याला मिळणारी अनुभूती आपल्यापर्यंत पोचण्याआधीच, त्या अनुभूतीची चाहूल लागताच आपण आपल्या मनाला शहाणपणाची शिकवण देऊ लागतो. मग तो अनुभव आपल्यापर्यंत पोचताना आपण त्याला सामोरे जायला पूर्ण तयार असतो. त्या अनुभवामधून मिळू शकणाऱ्या सर्व भावनिक चढ-उतारांची कल्पना आपण खूप आधीच करून ठेवलेली असते, त्यामुळे आपल्यापर्यंत पोचणारा अनुभव पांचट झालेला असतो. तिखट, गोड, कडू, आंबट अशी कोणतीच चव नसणारा. आडाखे, विश्लेषण या सगळ्या आपण आपल्याला लावून घेतलेल्या सवयींमुळे एखाद्या गोष्टीचा मूळ गाभा बाजुला राहातो आणि आपल्याजवळ उरतात ते आपण त्या गोष्टीबद्दल बांधलेले आडाखे.
माझ्या वडिलांचं निधन होऊन आता 11 वर्ष होऊन गेली. पण माझ्या मते, ते गेल्याचं दुःख मी 11 वर्षांनतर गोबीच्या वाळवंटात एकटी असताना खऱ्या अर्थानं केलं. जगासमोर दुःख करण्याची लाज वाटत होती, हे याचं करण नव्हे. तर बाबा गेले आणि ते आता माझ्या आयुष्यात माझ्या बरोबर नसणार, हे सत्य तोवर मला पूर्णपणे उमगलंच नव्हतं. हे सत्य मी आजवर रिचवलंच नव्हतं. दीर्घकालीन आजारामुळे बाबा गेले. त्यांच्या आजाराच्या तीव्रतेमुळे हे केव्हातरी होणार याची मानसिक तयारी होती. कदाचित त्यामुळेच, ते गणेश चतुर्थीला गेले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी या सत्याशी जुळवून घेतलेलं होतं. माझी लहान बहीण तर तेव्हा दुःख करण्याच्या देखिल वयात नव्हती. ती 6 वर्षांची होती. तिच्यासाठी म्हणून अगदी नकळत, शक्य तितकं नॉर्मल रहाण्याची आणि वागण्याची सवय मी लावून घेतली. आईला देखिल या दुःखामधून शक्य तितकं लवकर बाहेर येता यावं म्हणून पुन्हा ऑफिसला जायला लावलं. आणि एकूणच महिन्याच्या आतच सगळं गाडं पुन्हा एकदा रुळावर आणलं. काल पर्यंत बाबा माझ्याबरोबर होते. आज नाहीत. इतकं मी ते सोपं करून टाकलं. गेल्या 11 वर्षांत कित्येक कारणांनी कित्येक वेळा त्यांची आठवण आली असेल. पण मी स्वतःला त्या आठवणींमध्ये कधी रमूच दिलं नाही. कारण एकच.. यशस्वी व्हायचं असेल, तर आपण खंबीर, कणखर, वगैरे वगैरे रहायला हवं ही मिळालेली शिकवण. वाळवंटामध्ये दिवसचे दिवस एक अवाक्षरही न उच्चारता घालवल्यार्वर मनात गर्दी होत असे, ती याच सगळ्या अपुऱ्या राहिलेल्या अनुभवांची. बाबांच्या जाण्याची पूर्ण जाणीव माझ्या मना-शरीरीतल्या प्रत्येक कणाला झाली, ती या वाळवंटामध्ये. या वाळवंटामध्येच मी 11 वर्षांत प्रथमच त्यांच्या जाण्याचं दुःख केलं. अगदी रडून नाही. पण ती जाणीव ज्या दिवशी मला झाली, त्या दिवशी जणू आत्ताच बाबा सोडून गेल्याचं दुःख मला झालं. असे कित्येक अपुरे अनुभवलेले क्षण मी वाळवंटामध्ये पुन्हा एकदा पूर्णपणे अनुभवून घेतले.
मला हा अनुभव असा वाळवंटामध्येच का आला असावा? विचार केल्यावर लक्षात येतं, की मुळात मी माझा स्वतःचाच अनुभव प्रथम घेत होते. खूप खूप सोपं उदाहरण देऊन सांगता येईल. परत आल्यावर मी जिंदगी ना मिलेगी दोबारा हा चित्रपट बघितला. पैशांच्या मागे धावणारा हृतिक रोशन डीप सी डायव्हिंग चा अनुभव घेतो आणि आनंदाने त्याच्या डोळ्यांमधून अश्रू येतात. चित्रपटमधल्या या प्रसंगाशी मी स्वतःला खूप रिलेट करू शकले. श्वास घेणं आणि चालणं या दोन गोष्टी आपण रोजच्या जगण्यामध्ये प्रतिक्षिप्त क्रियेसारख्या करत असतो. त्याचा कोणताच विचार न करता. पण आपला चालत असणारा श्वास, त्याची एकसारखी लय, आपल्या श्वासाच्या तालाबरोबर लयीत पडणारी आपली पावलं, पावलांचा वेग वाढवला की लगेच वाढणारी श्वासाची गती... हे सगळं सगळं किती रम्य आहे. आपला प्रत्येक श्वासाचा अनुभव आपण जेव्हा घेतो, तेव्हा खरं तर आपण आपल्याच असण्याचा अनुभव घेत असतो. माझ्यासाठी हा अनुभव भारावून टाकणारा होता. आणि म्हणूनच कदाचित शरिराला कष्ट देऊनसुद्धा मी शीळ घालत, आनंदात त्या रखरखीत उन्हात 1636 किलोमीटर चालू शकले. जावेद अख्तर यांचे शब्द उधार घेऊन मनाची ही अवस्था नेमकी सांगता येईल..
पिघले नीलमसा बहता हुआ या समा
नीली नीलीसी खामोशिया
न कही हैं जमी न कही आसमा
सरसराती हुई टहनिया, पत्तिया
कह रही है की बस एक तुम हो यहा
सिर्फ मै हू मेरी सासे है और मेरी धडकने
ऐसी गहराईया, ऐसी तनहाईया
और मै, सिर्फ मैं
अपने होनेपे मुझको यकीन आगया...
वाळूच्या अथांग पसरलेल्या त्या समुद्रापुढे, त्या भव्यतेपुढे आपलं अस्तित्व आणि आपल्या क्षुद्रतेची जाणीव होणे ही फार दूरची गोष्ट राहिली. त्याआधी मुळात आपल्या असण्याचीच जाणीव होणं, आणि आपल्या शारिरिक आणि मानसिक रंध्रांना श्वास घेताना अनुभवणं हा अनुभव अवर्णनीय आहे. मोहीमेधून परत आल्यावर माझ्या मनामध्ये भरून राहिलेली कोणती एक आठवण असेल तर ती ही.
कित्येक वेळा, मी दिवस संपवून जेवण झाल्यावर माझ्या स्लीपिंग बॅगमध्ये शिरत असे, तेव्हा दिवसभरात मी चाललेलं प्रत्येक पाऊल मला आठवत असे. त्या पावलाखालचा रस्ता तसाच्या तसा माझ्या समोर जिवंत उभा राहात असे. काल दुपारच्या जेवणात आपण कोणती भाजी खाल्ली, हेही जेव्हा इकडे आल्यावर आठवेनासं होतं, तेव्हा वाळवंटात आलेला हा अनुभव मोठा विचित्र वाटतो. पत्येक क्षण त्यामधल्या छोट्या छोट्या कंगोऱ्यांसकट जगणं म्हणजे काय हे मला वाळवंटामध्ये उमगलं.
दिवसा खूप ऊन आणि रात्री खूप थंडी, आजुबाजुला पसरलेली फक्त रेताड, नापिक जमीन- एकही हिरवा कोंब नसलेली, क्षितिजाच्या विस्तारापर्यंत स्वच्छ दिसणारं दृश्य- एकसुरी. अशा परिस्थितीमध्ये जगभराच्या काना-कोपऱ्यांमधून आलेल्या अनोळखी लोकांबरोबर 52 दिवस चालताना स्वतःच्या अनेक क्षमतांचा कस लागला. अनेक धडे मिळाले. लहानपणापासून शिकलेल्या काही शिकवणींची उजळणी झाली. मुळात एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. आपल्यामध्ये असणाऱ्या सर्व क्षमता आजमावून बघण्याची ही संधी आपण स्वतःला किती वेळा देतो? संयम आणि संस्कारांच्या आपण आखून घेतलेल्या मर्यांदांमध्ये रहाण्याच्या अट्टाहासामुळे मर्यादेपलिकडे भासणाऱ्या काही गोष्टी करण्यासाठी आपण धजावतच नाही. आपल्याला असलेल्या या मर्यादा खरंच मर्यादा आहेत, की आपल्या सोयीसाठी आपणच घालून घेतलेले बांध आहेत, हे आपण पडताळूनच बघत नाही. आपल्यामध्ये असणाऱ्या प्रचंड शक्तीची जाणीव आपण स्वतःला होऊच देत नाही. आपापल्या आयुष्यात, आपापल्या परीने अशक्य आणि अवघड वाटणाऱ्या गोष्टी करुन बघण्याची, आपल्या त्या सोयीच्या आणि सवयीच्या परीघामधून बाहेर येण्याची थोडीशी तयारी दाखवली, तर आपली आपल्या स्वतःलाच नवीन ओळख होते. मला माझी नव्याने खरं म्हणजे प्रथमच ओळख झाली. रुटिनमध्ये घडणाऱ्या घटनाही रुटिनच असतात. त्यामध्ये धक्कादायक असं काही घडण्याच्या शक्यताच कमी असतात. त्यामुळे रुटिनमध्ये घडणाऱ्या काही प्रसंगांमध्ये आपल्या प्रतिक्रिया काय असतात, हे आपल्याला माहीत असतं. मात्र एखाद्या अनपेक्षित प्रसंगामध्ये आपणच दिलेल्या अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे स्वतःलाच चक्रावून टाकणारे प्रसंग किती येतात? आपण ते येऊच देत नाही. अगदी साधं उदाहरण द्यायचं, तर भूक लागली की आपण खातो. पण खूप खूप भूक लागूनसुद्धा जेवण न मिळून सुद्धा चालत राहिलं, तर आपण कसे वागतो हे मी प्रथमच अनुभवलं. स्वतःच्या मनालाच खेळवत रहाण्याचे, फसण्याचे अनेक मार्ग आपण कुठून कुठून काढत राहातो, तेव्हा आपल्यातल्या अचाट क्षमतेची जाणीव आपल्याला होते.
स्वतःला अशा चित्र-विचित्र परिस्थितीमध्ये टाकून स्वतःच्या प्रतिक्रिया, काठावर बसून स्वतःच बघण्यामधली मजा आता मला येऊ लागली आहे. माझ्यासाठी हा एक नवीन खेळच होऊन बसला आहे.
गोबी मोहीमेच्या दरम्यान मला आलेल्या या अनुभवांमुळे, मी खूप समृद्ध झाले. परत आल्यावर हेच सगळं अनुभव मनात रुंजी घालत राहिले. चालणं, बदलतं हवामान, मोठ्ठं अंतर, खडतर प्रवास, गोबी वाळवंट चालणारी पहिली भारती, वगैरे वगैरे गोष्टी खूप मागे पडल्या आहेत. मनात आहेत, ते फक्त हे अनुभव.










"अनुभव जानेवारी 2013 च्या अंकामधून साभार"


गेल्या काही भटकंती मधले अनुभव लक्षात घेता, प्रथमोपचार साहित्याचे महत्व पटायला लागले. वासोटा किल्ल्यावर असता एक वयस्कर पण अनुभवी काकांना दगडी कमानीतून जाताना उंचीचा अंदाज चुकल्याने डोक्याला जखम झाली. जखम छोटीशीच असून देखील रक्तस्त्राव बराच झाला. भोवताली तमाम गर्दी जमली, जेवढी डोकी तितकेच उपाय प्रत्येकजण सुचवत होता. नुसताच गलका आणि गोंधळ चालू होता. प्रथमोपचार पेटीचे महत्व प्रथम पटले ते त्या प्रसंगी. विचार केला की हा अनुभव अक्कल येण्यास पुरेसा असायला हवा. जर ह्यातून काही नाही शिकलो तर आपल्यासारखा मुर्ख दूसरा कोणीच नाही. त्या नंतर काही गोष्टी आवर्जून बरोबर बाळगू लागलो. एक मित्राला भटकंती दरम्यान पायाला काटा टोचला, थोडा वेळ त्याने कस अंगावर काढली. पण नंतर त्याला वेदना सहन होत नव्हत्या. आम्ही सर्व अश्या ठिकाणी पोहोचलो होतो की सुरु केलेली भटकंती पूर्ण केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. कारण परत जाणे देखील तेवढेच कष्टप्राय होते. तो जवळ जवळ रिटायर झाला. नाही जमत म्हणून चक्क खालीच बसला. त्याला लागलेला काटा पायात घुसून हाडाला टेकला होता. दुखपत हाडाला झाली होती अणि तो पाय जमिनीला टेकवू देखील शकत नव्हता. त्याला खांदा देत घेऊन जावं लागणार ह्या विचाराने मला दत्त दिसायला लागले होते. पण ऐन वेळी बरोबर बाळगलेल्या औषधांची मला आठवण झाली. Brufen ची एक गोळी त्याला दिली आणि तो थोड्याच वेळात आपल्या रंगात परत आला. दिसलेल्या दत्त महाराजांना नमस्कार करून मागे सोडले आणि पुढचा प्रवास आम्ही उड्या मारत पार केला. असेच काही अनुभव गाठीला बांधून प्रथमोपचार म्हणून थोड़े फार साहित्य बरोबर बाळगणे मी स्वतः वरच बंधनकरक केले. भटकंती कट्टाच्या अनुषंगाने हा विषय समोर आला आणि आमच्या अनुभवात मोठी भर पडली. Antihistamine, analgesic आणि xylocaine सारख्या औषधांचे महत्व आणि उपयोग आता कसा आणि कधी करायचा ह्याचे ज्ञान आम्हास प्राप्त झाले. एखाद्या अपघाताच्या क्षणी गरजू व्यक्तीस सुखरूप परत आणू एवढा विश्वास आता आमच्यात ह्या प्रथमोपचार पेटीने नक्कीच दिला आहे.












बेसिक माउन्टेनिअरिंग कोर्स - Basic Mountaineering Course (BMC) हा कोर्स HMI दार्जिलिंग, NIM उत्तरकाशी, JIM पहलगाम, ABVIMAS मनाली, IISM गुलमर्ग, NIMAS अरुणाचल प्रदेश, या सर्व संस्थांमध्ये उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी शालांत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
उद्देश: 
१) प्रशिक्षणार्थींमध्ये गिर्यारोहणाकडे केवळ छंद म्हणून न पाहता एक कला / एक खेळ म्हणून  दृष्टीकोन निर्माण करणे. २) आत्मविश्वासाने नवीन आव्हानांना तोंड व धैर्याने जबाबदारी स्वीकारण्यास प्रशिक्षणार्थींना शिकवणे. ३) एक संघ म्हणून काम व इतरांचा दृष्टिकोन समजून घेणे. ४) डोंगरदऱ्यांमध्ये स्वाभाविकरित्या कसे वावरावे, याचे शिष्टाचाराचे प्रशिक्षण देणे. ५) प्रशिक्षणार्थीचे शरीर काटक व मजबुत बनवणे.
अभ्यासक्रम:
या कोर्स अंतर्गत गिर्यारोहणाला वापरला जाणारा दोर, गाठी, नकाशे वाचन, प्रस्तरारोहण, प्रस्तरावरोहण, बर्फाच्या भिंती चढणे - उतरणे, क्रेवास रेस्क्यु, अश्या तंत्रांचे, तसेच डोंगरदऱ्यांमध्ये स्वाभाविकरित्या कसे वावरावे, या शिष्टाचाराचे देखील प्रशिक्षण दिले जाते. ( Ropes, knots, climbing, rappelling,(Rock - Craft) Ice - Craft, Snow - Craft,  Map Reading, Mountain manners )
ॲडव्हांस माउन्टेनिअरिंग कोर्स Advanced Mountaineering Course (AMC)
बेसिक माउन्टेनिअरिंग कोर्स मध्ये A ग्रेड मिळवाण्यारा प्रशिक्षणार्थींना हा कोर्स करता येतो. हा कोर्स HMI दार्जिलिंग, NIM उत्तरकाशी, JIM पहलगाम, ABVIMAS मनाली, IISM गुलमर्ग, NIMAS अरुणाचल प्रदेश, या सर्व संस्थांमध्ये उपलब्ध आहे.
उद्देश व अभ्यासक्रम:
१) या अभ्यासक्रमा अंर्तगत मोहीमेचे नियोजन व अंमलबजावणी यांचे प्रामुख्यानी प्रशिक्षण दिले जाते. २) तसेच या अभ्यासक्रमातुन भविष्यामध्ये मोहिमेसाठी नेते तयार व्हावेत अशी अपेक्षा असते. ३) बेसिक माउन्टेनिअरिंग कोर्स मध्ये शिकलेली कौशल्ये अधिक बारकाईने शिकावयास मिळतात. ४) विविध बचावकार्याचे  देखील प्रशिक्षण दिले जाते.
मेथड ऑफ इनस्ट्रकशन Method of Instruction (MOI)
गिर्यारोहणाकडे ज्यांचा व्यावसायिक कल आहे अश्यांसाठी हा अभ्यासक्रम आहे. ए एम सी मध्ये "अ" श्रेणी मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थींना या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. प्रशिक्षणार्थींची तांत्रिक कौशल्यांची क्षमता पडताळली जाते. विद्यार्थ्यांना हाताळण्याचे व शिकवण्याचे क्षमता विकसित करण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते .प्रशिक्षांर्थी आपापल्या भागात पर्वतारोहणची  वाढ करू शकेल असे संभाव्य शिक्षक तयार करण्यासाठी या अभ्यासक्रमाची उभारणी केली गेली आहे.
हा कोर्स HMI दार्जिलिंग, NIM उत्तरकाशी, JIM पहलगाम, ABVIMAS मनाली, IISM गुलमर्ग, या सर्व संस्थांमध्ये उपलब्ध आहे.
सर्च ॲण्ड रेस्क्यु Search & Rescue ( S&R)
गिर्यारोहणाकडे ज्यांचा व्यावसायिक कल आहे अश्यांसाठी हा अभ्यासक्रम आहे. ए एम सी मध्ये "अ" श्रेणी मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थीना या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.
प्रशिक्षणार्थींना GPS आणि नकाशा वाचनाची   कौशल्ये माहीत असणे आवश्यक आहे. प्रथमोपचार , माउंटन नेव्हिगेशन , विविध संघटना, रेडिओ, टेलिफोन, या मध्ये समन्वय साधणे व बचाव कार्या दरम्यान त्यांच्या सहभागाची अपेक्षा असते.
हेलीकाॅप्टरद्वारे वा इतर साधने वापरून बचाव कार्य करणे व बचाव कार्य करण्याऱ्या मोहीमेचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक क्षमतेचे विकसन करणे असे या अभ्यासक्रमाचे प्रमुख उदिष्ट आहे.
सध्या भारतात हा अभ्यासक्रम आयोजित करणारी फक्त एकच संस्था आहे . - NIM
गिर्यारोहण अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्याविषयी: 
फॉर्म संबंधित संस्थेच्या website वर उपलब्ध असतात. प्रशिक्षार्थीची सामान्य व वैद्यकीय माहिती असे या फॉर्म चे स्वरूप असते. सदर प्रवेशिका Gazetted Officer व डॉक्टरकडून सही शिक्का घेऊन फी च्या रकमेच्या डिमांड ड्राफ्ट सोबत Registered पोस्टाने पाठवावा लागतो.
शारीरिक स्वास्थ्य मानक: ( Physical Fitness Standards)
१) प्रशिक्षणार्थीची शारीरिक स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. २) लोड घेऊन असमान ट्रॅक वर लांबपर्यंत चालणे श्रेयस्कर आहे . ३) लांब अंतर चालणे आणि नियमित व्यायाम करत असणे उपयुक्त. ४) शोध आणि बचाव अभ्यासक्रमात शारीरिक तंदुरुस्तीची उच्च पातळी आवश्यक आहे.

१) हिमालयन माउन्टेनिअरिंग इन्स्टिट्यूट (HMI), दार्जिलिंग :
१९५३ साली श्री. शेर्पा तेनझिंग नोर्गे व श्री. एडमंड हिलरी यांनी सर्वप्रथम एव्हरेस्ट सर केले. या मोहिमेनंतर  श्री. शेर्पा तेनझिंग नोर्गे यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा फायदा सर्वांना मिळावा व गिर्यारोहण क्षेत्राचा भारतवर्षामध्ये प्रसार व विकास व्हावा या विचारातून श्री. पंडित नेहरू यांनी रक्षा मंत्रालयाच्या अख्यारीत हि संस्था दार्जिलिंग येथे  स्थापन केली. 
भारतातील सर्वात पहिल्या अशा या संस्थेमध्ये अत्यंत अल्पदरात प्रशिक्षणाची सोय आहे. अद्ययावत सोयी-सुविधांनी संपन्न अशा या संस्थेत बेसिक, ॲडव्हांस , मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन असे कोर्सेस घेतले जातात. 
२) नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउन्टेनिअरिंग (NIM), उत्तरकाशी:
नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउन्टेनिअरिंग (NIM), भारतातील सर्वोत्तम पर्वतारोहण संस्था म्हणून नामांकन आणि आशियातील सर्वात प्रतिष्ठित पर्वतारोहण संस्था आहे असे मानले जाते .१९६४ साली उत्तरकाशी येथे चालु झालेल्या या संस्थेमध्ये बेसिक, ॲडव्हांस , मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन व सर्च & रेस्क्यु असे कोर्सेस घेतले जातात.
Website: www.nimindia.net


३) अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउन्टेनिअरिंग ॲण्ड अलायीड स्पोर्ट्स (ABVIMAS), मनाली 
अटलबिहारी वाजपेयी पर्वतारोहण आणि इतर क्रीडा  संस्था , मनाली ( ABVIMAS ) आज देशातील सर्वात मोठे साहसी खेळ प्रशिक्षण केंद्र आहे . येथे गिर्यारोहणा बरोबरच skiing, aqua -sports यांचेही प्रशिक्षण दिले जाते. 
४) जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउन्टेनिअरिंग ,(JIM) पहेलगाम : 
या संस्थेची स्थापना एकाच ठिकाणी असंख्य उत्कंठापूर्ण खेळांचे प्रशिक्षण  प्रदान करण्याच्या दृष्टीने पहेलगाम , जम्मू आणि काश्मीर जवळ , अरु येथे 1983 मध्ये करण्यात आली . येथे गिर्यारोहण, skiing, aqua -sports बरोबरच Paragliding चे ही प्रशिक्षण दिले जाते.
५) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किइंग & माउन्टेनिअरिंग , (IISM), गुलमर्ग. :
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किइंग & माउन्टेनिअरिंग पर्यटन मंत्रालयाने गुलमर्ग येथे 1969 मध्ये स्थापना केली. सुरवातीला गुलमर्गची आंतरराष्ट्रीय स्की रिसॉर्ट म्हणून विकसित करण्यासाठी गुलमर्ग हिवाळी क्रीडा प्रकल्प ( GWSP ) नावाचा एक प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आला . आता विविध साहसी अभ्यासक्रम आणि रोमांचक कॉर्पोरेट उपक्रमांचे आयोजनही अत्यंत आधुनिक अशी ही  संस्था करते. देशातीलच नव्हे तर जगभरातील प्रशिक्षणार्थी तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणात या उपक्रमांकडे आकर्षित होतात. 
६) नँशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउन्टेनिअरिंग ॲण्ड अलायीड स्पोर्ट्स (NIMAS), अरुणाचल प्रदेश
सन 2013 मध्ये दिरांग, अरुणाचल प्रदेश येथे स्थापन करण्यात आलेली ही संस्था तरुणांना साहसी आणि मैदानी शिबिर जीवनात तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आली. 
या संस्थेची website अजून तरी उपलब्ध नाही. 
पत्ता: NIMAS, Pin 900190, c/o 99 APO ( सेना टपाल सेवा) 
फोन: Phone No: 03780-242110 Mobile: 09435722400
फेसबुक पेज: National Institute of Mountaineering & Allied Sports
या व्यतिरिक्त (१) आर्मी माउन्टेनिअरिंग इन्स्टिट्यूट (सियाचीन) आणि (२) सोनम ग्यात्सो माउन्टेनिअरिंग इन्स्टिट्यूट (गंगटोक)  अश्या सैनिकी गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था आहेत. या फक्त सेना अधिकाऱ्यांना गिर्यारोहण प्रशिक्षण देतात. 
इंडियन माउन्टेनिअरिंग फाउंडेशन (IMF), नवी दिल्ली:  या सर्व संस्था इंडियन माउन्टेनिअरिंग फाउंडेशन या संस्थेशी संलग्न आहेत. गिर्यारोहण क्षेत्रामध्ये इंडियन माउन्टेनिअरिंग फाउंडेशन भारतातील सर्वोच्च संस्था आहे, सर्व मोहिमा इथे नोंदवाव्या लागतात. हि संस्था गिर्यारोहकांना सर्व प्रकारची प्रशिक्षण व मदत, हिमालयीन पर्यावरणाचे संरक्षण, मोहिमांची नोंदणी / परवानगी अश्या प्रकारचे काम करते. 
Website: http://www.indmount.org/Home.aspx फेसबुक पेज: Indian Mountaineering Foundations
सह्याद्री मित्रहो,

आपला हक्काचा भटकंती कट्टा सुरु झालापहिल्याच कट्ट्यावर "trekking safety आणि mountaineering institute in india" असा भटकंतीमधला सर्वात महत्वाचा विषय आपण घेतला.

सुरेंद्र शेळके सर आणि सुनील पिसाळ सरांसारख्या अनुभवी गिर्यारोहकांचे अनुभव आपण ऐकलेभटक्यांना साजेशी अशी अगदी सकस चर्चा आपण कट्ट्यावर केलीट्रेकिंगमध्ये safety सगळ्यात जास्त महत्वाची असून तीच कुठेतरी बाजूला पडते म्हणून हे विषय आपण अट्टाहासाने पहिल्याच कट्ट्यावर घेतले होते.

भटकंती कट्ट्याचा विषय डोक्यात अजून ताजा असतानाच आज किल्ले सिंहगडावर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलीसिंहगडावर भटकंतीसाठी गेलेल्या तीन गिर्यारोहक मित्रांपैकी एकाचा कड्याहून तोल जाऊन दुर्दैवी अंत झालाआपले गिर्यारोहक मित्र Sunil Pisal सर, Pappu Bhosale, दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेचे पाच-दहा गिर्यारोहक घटनेची माहिती मिळाल्या मिळाल्या तासाभरात तिथे पोहोंचलेले पण तोवर काळाने घात केला होताचुकचुकण्यावाचून आपल्या मित्रांच्या हातात काहीच शिल्लक नव्हतंसिंहगडासारखा गिर्यारोहणाच्या दृष्टीने अत्यंत सोपा समजल्या जाणार्या किल्ल्यावर जर अशी घटना होऊ शकते तर सह्याद्रीच्या अनगड वाटांवर थोडसंही दुर्लक्ष किती महागात पडू शकेल याचा विचारही काळजाला पीळ पाडतो.

आज सिंहगडावर मृत्यूमुखी पडलेल्या गिर्यारोहकाच्या मृतआत्म्याला सद्गती लाभोत्याच्या काय चुका होत्या हे उगाळत बसण्यासाठी सदरील पोस्ट टाकण्याचा माझा हेतू नाहीप्रत्येक नव्या-जुन्या गिर्यारोहकाने स्वतःच्या मर्यादा ओळखाव्या आणि त्याच मर्यादेत स्वतःला जखडून ठेवावं एवढाच निखळ हेतू ह्या पोस्ट मागे आहेस्वतःच्या मर्यादांपलीकडे साहस सुरु होतं हे जरी काही अंशी खरं असलं तरीज्या साहसाला आपण सामोरे जाणार आहोत त्याच्याशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी असल्याशिवाय त्यात उतरणं म्हणजे फक्त जीवाशी खेळ असतोस्वतःच्या मर्यादा प्रमाणापेक्षा जास्त ताणण्यात एक-दोन वेळा यश मिळेलही पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही.

मित्रहो,
महिन्यातून एखादी भटकंती कमी झाली तरी चालेलएखाद्या भटकंतीमध्ये छायाचित्रण करायला नाही मिळालं तरी चालेल पण तुम्ही जसे गेलेलात तसेच परत यायला हवंइतर कुठच्याही गोष्टीला स्वतःच्या आणि तुमच्या सोबत भटकंतीला आलेल्या मित्राच्या सुरक्षेपेक्षा कमी महत्व द्या.
काही अगदी अगदी साधे भटकंती नियम देतोय जेणेकरून डोंगरात कमीत कमी अपघात संभवतील. ( भटकंती सुरक्षेच्या अनुषंगाने कोणाला अजून काही सुचवायचं असेल तर कमेंटमध्ये जरूर सुचवासगळ्या सूचना एकत्र करून त्याची ".doc file" सर्वांसाठी उपलोड केली जाईल. )
________________________________________

कुठेही भटकंतीला जाताना कुठे जाणार आहात याची पुस्तकांतूनइंटरनेटच्या माध्यमातूनअनुभवी भटक्यांकडून सर्व बारकावे काढून घ्या.
________________________________________

) solo trek कटाक्षाने टाळाकिमान तीन आणि जास्तीत जास्त ५ ते ७ डोंगरमित्र सोबत असावीत.
________________________________________

गडांवर जाणाऱ्या धोपट वाटा सोडून ढोर-वाटाचोरवाटांनी गडावर जायचं असेल तर स्थानिकांशी पूर्ण चौकशी करूनचं अश्या वाटा तुडवाव्याअश्या वाटांचा जाणकार एखादा 
स्थानिक गावकरी वाटाड्या म्हणून घ्यावाअती घाई किंवा वेडं साहस करू नये.
________________________________________

बॅग भरतानाजास्तीचे जेवणमुबलक पाणीप्रथमोपचार पेटी आणि विजेरी न चुकता घ्यावी. "जेवण तिथे मिळेलपाणी गडावर असेलदिवसा-उजेडी परतूअश्या हिशोबात राहू नये-२ किलो जास्ती वजन बॅगेत असलं तर फार काही मोठा फरक पडत नाही.
________________________________________

स्थानिक गावकर्यांमध्ये आवर्जून मिसळात्यांचे फोन नंबर घेवून ठेवात्यांच्या मांडीला मांडी लावून बसावेगळेपणा\मोठेपणा दाखवू नकाकठीण प्रसंगी हीच मंडळी मदत करणारी ठरतात.
________________________________________

) bsnl- Idea - vodafone (बहुतांशी डोंगरात या तीन network ला बर्यापैकी रेंज असते.) अशी दोन-तीन कार्ड बाळगाप्रत्येक कार्डमध्ये किमान १० रुपये तरी बॅलेंस असावं.
________________________________________

मोबाईल अगदी साधा असावाज्याची battery life जास्त असावीजेणेकरून मोठ्या ट्रेकमधेही फोन बंद पडणार नाहीकट्ट्यावर दाखवलेला Maxx Power House-MX200 mobile मोठ्या ट्रेकसाठी अगदी योग्य आहे.
________________________________________

महागडे मोबाईल इंटरनेटसाठी ट्रेकमध्ये नेणं टाळावं, GPS साठी मोबाईल इंटरनेट वापरणार असाल तर हरकत नाही.
________________________________________

अवघड ट्रेकमध्ये अवजड कॅमेरे आणि लेन्सचे लटांबर वागवू नयेते बोचकं सांभाळण्यात अर्धा जीव निघतो.
________________________________________

१०जगापेक्षा वेगळा कॅमेरा अँगल हवा म्हणून जाता येत नाही अश्या जागी जाणंकड्याच्या अगदी टोकाला उभं राहून सेल्फी काढणं कटाक्षानं टाळावं.
________________________________________

११डोंगरात रात्री मुक्काम असेल तर अंधार होण्याआधी मुक्कामाची जागा निवडावीझोपायला टेंट असेल तर उत्तमविंचू-काट्याची भीती राहत नाहीतटेंट नसेल तर मुक्कामासाठीच्या जागेचा प्रत्येक कोपरा काठी आपटून तपासून घ्यावासाप-विंचू-गोम किंवा तत्सम विषारी प्राणी असू शकतो.
________________________________________

१२पावसाळ्यात पायवाटा आणि हिवाळ्यात दव पडल्याने वाळलेलं गवत कमालीचं निसरडं होतंतेंव्हा पावसाळयात आणि वाळलेल्या गवतावर अगदी जपून चालावं.
________________________________________

१३जंगली सरपटणाऱ्या प्राणी-कीटकांची योग्य माहिती असल्याशिवाय हातात घेवून छायाचित्रण करू नयेसापांचं छायाचित्रण अगदी जवळ जाऊन करू नयेमण्यार-घोणस-फुरसे-नाग अश्या सापांचा प्रतिक्षेप (reflex) अत्यंत शीघ्र असतोआपण हात मागे घेई पर्यंत घोणस-फुरसे चावा घेवून परतलेले असतातडोंगरात जर असा साप चावला तर वेळेत उपचारही मिळू शकणार नाही.
________________________________________

१४जंगलात कॅमो प्रिंटचे कपडे असावीत आणि प्रस्तरारोहणावेळी पिवळ्या किंवा भडक रंगाचे कपडे असावेतपूर्ण बाहीचे शर्ट आणि फुल पँट उत्तम.
________________________________________

१५चांगल्या ग्रीपचे बूट भटकंतीमध्ये खूप महत्वाचेमहागड्या बुटांनाच फक्त ग्रीप असते असं काही नाही. Action चे trekking शूज फक्त ९०० रुपयांमध्ये येतातत्यांना चांगली ग्रीप आहे.
________________________________________

१६चालताना knee cap आणि trekking stick वापरावीदोन्हींच्या वापराने गुढघ्यावर ३०कमी भर पडतो.
________________________________________

१७दारू किंवा कसलंही व्यसन कधीही वाईटचंडोंगरात तर ते सर्वात वाईटनशेत अपघाताचे प्रमाणे कित्त्येक पटीने वाढतंडोंगरात कसलंही व्यसन करू नकाकरू देऊ नका.
________________________________________

१८सर्व भटक्यांनी चार आठवड्याचा वेळ काढून basic mountaineering course करावाचत्याला पर्याय नाही.
mountaineering institute in india

1) Nehru Institute Of Mountaineering, uttarkashi

2) Himalayan Mountaineering Institute, darjeeling

3) Indian Institute of Skiing and Mountaineering, Gulmarg

4) atal bihari vajpayee mountaineering institute, manali

भारतात हे चार institutes आहेतत्यांच्या website दिल्या आहेतवेळ काढून चाळा.
basic आणि advanced असे दोन कोर्स असतातदोन्ही कोर्सची संपूर्ण माहिती लेख स्वरुपात लवकरच पोस्ट केली जाईल.

अशोक पवार-पाटील सरांचे "सुळक्याकडून सुळक्याकडेहे पुस्तक आवर्जून घ्यात्यात प्रस्तरारोहणाची- mountaineering institutes ची सविस्तर माहिती दिली आहे.
________________________________________

१९डीओड्रंट-पावडर किंवा उग्र वासाचे तेल अजिबात वापरू नयेतअश्याने मधमाश्यागांधीलमाश्या खवळतातमधमाश्यांचा-गांधीलमाश्यांचा हल्ला संभवतो.
________________________________________

२०चहा-जेवण्यासाठी चूल पेटवताना आसपास मोहोळ नाही ना याची शहानिशा करून घ्यावीधुराने चिडलेल्या मधमाश्या हल्ला करू शकतातजेवण बनल्यावर चूल व्यवस्थित विझवावीचुलीत आग धुसमसत असेल तर वाऱ्याने ठिणगी उडून अघटीत घटना घडू शकते.
________________________________________

२१प्रत्येक भटकंतीमध्ये किमान ५०-६० फुटी दोर बाळगावा,५०-६० फुटी छोटे वाटणारे कडे सुद्धा धोका देऊ शकतातअसे कडे चढून गेल्यावर काही ठिकाणी dead block होऊ शकतोपुढे किंवा मागे फिरणं ही अश्यक्य होऊन जातं आणि अपघात घडतातछोटा दोर असेल तर असे कडे पार करायला फारसा त्रास होत नाही.
________________________________________

२२घरच्या मंडळींना तुम्ही कुठे जातायकधी परत येतायसोबत कोण कोण आहेसोबतच्या मित्रांचे मोबाईल नंबरकिती दिवसांची भटकंती आहेरात्री कुठे राहणार आहात अशी सगळी माहिती द्यारेंज मिळेल तिथून घरी एक फोन करून ख्यालीखुशाली कळवा.
________________________________________

मित्रहो लक्षात ठेवा "सीर सलामत तो पगडी पचास", सह्याद्री कुठे निघून जाणार नाहीतेंव्हा घाई कसलीसह्याद्रीची काळजी घ्यास्वतःची काळजी घ्यानिसर्गाशी तादात्म साधाभटकंतीचा निखालस आनंद लुटा.

याऊपर trekking safety बद्दल कोणाला काही सुचवायचं असेल तर नक्की सुचवासर्व महत्वाचे मुद्दे एकत्र केले जातील.

#भटकंती_कट्टा
#Trek_Safe